शुक्रवारी पाकिस्तानने पक्तिका प्रांतातील उर्गुन आणि बारमल जिल्ह्यात हवाई हल्ला केला, ज्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आणि 10 हून अधिक जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन मुले आणि तीन क्रिकेटपटूंचा समावेश आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर तणाव वाढत आहे. दोन्ही देशांनी अलीकडेच दोन दिवसांच्या युद्धबंदीवर सहमती दर्शविली होती, परंतु पाकिस्तानने केलेल्या या नवीन हल्ल्यामुळे शांतता कराराचा भंग झाला आहे.