पावसाने ओढ दिल्याने राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. याचा परिणाम कांद्यावर झाला आहे. महाराष्टात प्रचंड उत्पादन होत असल्याने कांद्याची निर्यातही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, पिकावर परिणाम झाल्याने दर वाढले आहेत.
बाजार समित्यांमध्येच कांद्याचा भाव ५५ रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. तर किरकोळ बाजारात ६० रुपयांच्यावर पोहोचला आहे. दुष्काळ आणि इतर समस्यांशी लढताना दमझाक होत असतानाच आता कांदा सरकारच्याही डोळ्यातून पाणी काढणार, अशी स्थिती आहे.