श्री गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करण्याचे महत्त्व जाणून घ्या

शुक्रवार, 30 मे 2025 (15:38 IST)
श्री गणेश हे हिंदू धर्मातील महत्वाचे देवता असून कोणतेही शुभ काम श्री गणेश पूजन करूनच सुरु होते. तसेच गणेशाच्या पूजेसाठी प्रत्येक महिन्यातील चतुर्थी तिथी महत्त्वाची मानली जाते. या दिवशी उपवास करून गणेशाची पूजा केल्याने साधकाचे सर्व अडथळे दूर होतात. 
ALSO READ: डाव्या हाताने प्रसाद अर्पण करण्यास मनाई का आहे? जाणून घ्या धार्मिक श्रद्धेचे रहस्य
तसेच हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, चतुर्थीला गणेशाची योग्य पद्धतीने पूजा केल्याने जीवनात सुख आणि समृद्धी येते. गणेशाच्या पूजेदरम्यान दुर्वा अर्पण करणे देखील विशेष महत्त्वाचे मानले जाते. अश्यावेळेस दुर्वा अर्पण करण्याचे महत्व, नियम आणि मंत्र जाणून घ्या.
 
दुर्वा अर्पण करण्याचे महत्त्व
दुर्वा, ज्याला दूब म्हणूनही ओळखले जाते, तो त्रिदोषाचा नाश करणारा मानला जातो. भगवान गणेशाच्या पूजेत दुर्वा अर्पण करण्यासोबतच, दुर्वा शुभ कार्यात देखील वापरला जातो. त्याशिवाय कोणतेही शुभ कार्य अपूर्ण आहे. आयुर्वेदातही दुर्वाचे अनेक गुणधर्म सांगितले आहे, जे ते विशेष बनवतात. 
ALSO READ: तुम्हाला माहित आहे का? ही भारतातील सर्वात जुनी वटवृक्ष आहे
दुर्वा अर्पण करण्याचे नियम
भगवान गणेशाची पूजा करताना त्यांना २१ जोड्या  दुर्वा अर्पण करावी. असे करणे शुभ मानले जाते. असे केल्याने व्यक्तीला भगवान गणेशाचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख-समृद्धी राहते. दुर्वा अर्पण करताना ती स्वच्छ पाण्याने धुवावी. तसेच, हे लक्षात ठेवा की दुर्वा स्वच्छ ठिकाणाहून आणावी. 
 
दुर्वा अर्पण करण्याचा मंत्र
।। 'श्री गणेशाय नम: दुर्वांकुरन समर्पयामि'।।
चतुर्थीच्या वेळी भगवान गणेशाला दुर्वा अर्पण करताना  या मंत्राचा जप करावा. असे केल्याने विघ्नहर्ता प्रसन्न होतो आणि भक्ताच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. 
ALSO READ: मोठ्या कामासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी दही-साखर हातावर का दिली जाते, जाणून घ्या यामागील कारण

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती