घटस्फोटाच्या बातम्यांमुळे गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा चर्चेत आहेत. मंगळवारी सकाळी, गोविंदा आणि सुनीता 37 वर्षांच्या लग्नानंतर वेगळे होत असल्याची अफवा पसरली. या जोडप्याने अद्याप या वृत्तांवर भाष्य केलेले नसले तरी, अभिनेत्याची भाची आरती सिंगने हे वृत्त निराधार असल्याचे सांगत त्याचे खंडन केले आहे.
आरतीने एका वृत्त वहिनीला सांगितले की, ती शहरात नाही, परंतु ती आत्मविश्वासाने सांगू शकते की गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाच्या बातम्या निराधार आहेत. आरती म्हणाली की गेल्या काही वर्षांत त्यांनी खूप मजबूत आणि प्रेमळ नाते निर्माण केले आहे, मग ते घटस्फोट कसा घेऊ शकतात? मला माहित नाही की लोकांना अशा अफवा कुठून येतात? हे पूर्णपणे चुकीचे आहे.
गोविंदाचे सचिव शशी सिन्हा यांनी त्यांच्या घटस्फोटाच्या वृत्ताचे खंडन केले आहे.हे संपूर्ण प्रकरण बनावट आहे. त्यांनी म्हटले की या वृत्तांमध्ये काहीही तथ्य नाही. मी नेहमीच गोविंदासोबत राहतो आणि असं काहीही नाही. सुनीता यांनी मुलाखत दिली असेल आणि कोणीतरी त्यांचे शब्द विकृत केले असतील, म्हणूनच अशा बातम्या आल्या आहेत.