आमिर खान आणि किरण राव यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला, म्हणाले - व्यवसाय संबंध कायम राहतील, एकत्र मुलाची काळजी घेतील

शनिवार, 3 जुलै 2021 (11:54 IST)
मुंबईच्या चित्रपट जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आमिर खान आणि किरण राव यांचे घटस्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी 28 डिसेंबर 2005 रोजी दुसरे लग्न केले. लग्नानंतर दोघांनीही एकत्र अनेक चित्रपट केले. त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांना एक मुलगा देखील आहे, ज्याचे नाव आझाद राव खान आहे. २००२ साली आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्तापासून घटस्फोट झाला. त्यानंतर किरणराव त्यांच्या आयुष्यात आल्या.
 
दोघांनीही संयुक्त निवेदन जारी केले
आमिर आणि किरण यांनी त्यांच्या विभक्ततेबाबत संयुक्त विधान जारी केले. ते म्हणाले की आमचे व्यावसायिक संबंध कायम राहतील. याशिवाय आम्ही एकत्र मुलाची काळजीही घेऊ.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती