त्यांच्या बोल्ड आणि बिनधास्त लेखनाचा खास वाचकवर्ग आहे. मध्यंतरी त्यांनी आध्यात्मिक लेखन सुरु केले. स्वामी रामकृष्ण परमहंस-शारदादेवी यांचा जीवनपट मांडणारे 'दोन डोळे शेजारी ', स्वामी विवेकानंदांवरील 'संन्याशाची सावली', साईबाबांवरील 'अनाथांचा नाथ' असे लेखन त्यांनी केले.