नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांना सोडविण्यासाठी २५ बसचीही सोय करण्यात आली असून लष्कराची आणखी तेरा विमाने काठमांडूच्या दिशेने रवाना होणार आहेत. भारतामध्ये आतापर्यंत ६२ जणांनी प्राण गमावले असून, भूकंपामध्ये मरण पावलेल्या भारतीय व्यक्तींच्या कुटुंबीयांना ६ लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.