Parenting Tips: मुलांसमोर चुकून देखील पालकांनी या गोष्टी बोलू नये, वाईट परिणाम पडेल

रविवार, 7 जानेवारी 2024 (11:08 IST)
Parenting Tips:वारंवार चेष्टा करणे, टोमणे मारणे किंवा चुकीची उपमा वापरणे याचा मुलांवर खोलवर परिणाम होतो. अनेक मुले भीतीने जगू लागतात. मुले त्यांच्या पालकांकडून जीवनाचे तत्त्वज्ञान शिकून मोठी होतात. बाहेरच्या जगात पाऊल ठेवण्यापूर्वी त्यांचे पहिले शिक्षण घरीच होते. अशा परिस्थितीत त्यांना त्यांच्या पालकांकडून काही चुकीचा धडा मिळाला तर ते आयुष्यभर त्यांच्या मनात अडकून राहते. अनेक पालक आपल्या मुलांना अशा गोष्टी सांगतात की त्यांच्यात जगाविषयी समान धारणा किंवा दृष्टिकोन विकसित होतो. पालक आपल्या मुलांचे वागणे, जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींबद्दल अनेकदा त्यांची चेष्टा करतात. असं करू नये नाही तर त्यांच्या मनात भीती बसते आणि त्यांच्यात आत्मविश्वासाची कमी होते. या काही गोष्टी पालकांनी मुलांसमोर अजिबात बोलू नये. 
 
चहा प्यायल्याने रंग काळा होईल -
नेहमी ऐकतो की माता आपल्या मुलांना चहा पिण्यापासून रोखतात. विशेषत: मुलींच्या रंगाबाबत असे म्हटले जाते की चहा प्यायल्याने रंग गडद होतो आणि दूध प्यायल्याने गोरा होतो. मुलींना दूध किंवा चहाचे आरोग्यदायी फायदे न सांगता, आपण त्यांच्या मनात वर्णद्वेषाची संकल्पना बसवतो, जी त्यांच्यासोबत वाढते. चहा पिल्याने किंवा न पिल्याने तुम्ही काळा किंवा पांढरा होतो याचा कोणताही पुरावा नाही.
 
मुलीसारखं रडायचं नाही- 
आपण अनेकदा ऐकलं आहे की आई आपल्या मुलाला रडताना विचारते, तू मुलीसारखं का रडतोस? अशा परिस्थितीत मूल विचार करेल की रडणे हा फक्त मुलींचा स्वभाव आहे, मुलांना तसा अधिकार नाही. अशा गोष्टी बोलून आपण मुलांमध्ये चुकीची विचारसरणी वाढवतो. असे बोलणे टाळावे.
 
शरीराच्या रंग रूप वर टीका करणे -
पालक सतत त्यांच्या मुलाच्या खाण्याच्या सवयींवर टीका करतात आणि त्यांच्या शरीराच्या आकारावर टिप्पणी करतात. तुमच्या या सवयीमुळे मुलाला त्याच्या दिसण्याबाबत असुरक्षित वाटू शकते. तो नेहमी घाबरत राहील. त्यामुळे मुले कशीही असली तरी त्यांच्या शरीराच्या प्रतिमेवर कधीही भाष्य करू नका
 
कुठलीही उपमा देऊन बोलू नका
पालकांना त्यांच्या मुलांच्या कृती, सवयी, खाण्याच्या सवयी उपमा देऊन समजावून सांगण्याची सवय असते. त्यांना असे वाटते की ते मुलांना गमतीने हे सांगत आहेत, परंतु या गोष्टींचा मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर खोलवर परिणाम होतो आणि त्यांचा आत्मविश्वास कमकुवत होतो. त्यांना वाटू लागते की आपण असे आहोत कारण त्यांचे आई-वडील त्यांचा असा विचार करतात.
 
कान मिरचीसारखे लाल झाले 
अनेक पालकांकडून हे ऐकले असेल की त्यांचे कान मिरच्यासारखे लाल झाले आहेत . मुलाला राग आला की आई म्हणते तुझे कान मिरच्यासारखे लाल झाले आहेत. याचा अर्थ, तुम्ही रागाची मिरचीशी बरोबरी करत आहात. ते साहित्यिक वाटेल, पण मुलांवर त्याचा वाईट परिणाम होतो.

Edited By- Priya Dixit    
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती