मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने निवडणूक आयोगाच्या सहकार्याने केलेल्या फिक्सिंगबद्दल काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात बोलत होते. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत सरकार आणि निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले, परंतु निवडणूक आयोगाला अजून समाधानकारक उत्तर देता आलेले नाही. थोरात म्हणाले की मतदारांचे लक्ष विचलित करण्यासाठी काही मंत्रीच या प्रश्नांची उत्तरे देतात, परंतु या प्रश्नांची उत्तरे देणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे. असे देखील ते यावेळी म्हणाले.