महायुतीचे मंत्री रोहित पवारांच्या रडारवर, मेघना बोर्डीकर यांचा व्हिडिओ व्हायरल

सोमवार, 4 ऑगस्ट 2025 (14:56 IST)
सध्या महायुती सरकारच्या मंत्र्याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहे. महायुती सरकारचे मंत्री सध्या राष्ट्रवादी शरदपवार पक्षाचे आमदार रोहित पवारांच्या रडारवर आहे. ते मंत्र्यांना सातत्याने लक्ष्य करत आहे. रोहित पवार यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर पत्ते खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल केला होता आता त्यांनी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल केला आहे ज्यामध्ये मेघना बोर्डीकर एका ग्रामसेवकाला थोबाडीत मारण्याची धमकी देत आहे. 

ALSO READ: राजकीय मतभेद विसरून शरद पवार आणि अजित पवार एका समारंभात एकत्र दिसले, दोन वर्षांनी हा योगायोग कसा घडला?
रोहित पवार यांनी एक्स अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ते लिहितात विधानसभेत रमी खेळणारे, पैशांनी बॅगा भरणारे, डान्सबार चालवणारे, आधी चुकीची कामे करून नंतर चांगली कामे केलेली दाखवणारे आणि आता अधिकाऱ्यांना कानशिलात लागण्याची धमकी देणारे मंत्री आहे. हे असे कसे मंत्री देवेन्द्रजी आपण निवडले आहे. जे मंत्रिमंडळाचा आदर गमावत आहे त्यामुळे महाराष्ट्राचा अपमान होत आहे. 
ALSO READ: विजय वडेट्टीवार यांचा आरोप, म्हणाले- निवडणूक आयोग सरकारच्या इशाऱ्यावर काम करत आहे
परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी गावात एका कार्यक्रमादरम्यान राज्यमंत्री बोर्डीकर एका ग्रामसेवकावर रागावले. त्यांनी त्यांना फटकारले आणि विचारले की तुम्हाला कोण पैसे देतो? ती पुढे म्हणाली की तुमची चापलूसी इथे चालणार नाही. हे सर्व थांबवा नाहीतर मी तुम्हाला आत्ताच काढून टाकेन.
 
रोहित पवार यांनी पुढे प्रश्न विचारला आणि लिहिले की, घरकुल योजनेचे लाभार्थी आणण्याचे उद्दिष्ट साध्य न केल्याबद्दल राज्याचे मंत्री ग्रामसेवकाला मारहाण करण्याची धमकी कशाच्या आधारावर देऊ शकतात? यासोबतच रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्र्यांना रोखण्याचे आवाहन केले आहे.
ALSO READ: शंभूराज देसाई यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या 'सनातन धर्म' वरील वादग्रस्त विधानावर टीका केली
मंत्री बोर्डीकर यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका दिवसानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आणि म्हटले की मंत्री कधीकधी त्यांच्या भाषणात विनोदाने गोष्टी बोलतात. जर आपण प्रत्येक गोष्टीवर टीका करू लागलो तर ते बरोबर नाही. काही विधाने आवश्यक असतात तर काही चुकीची असतात.मेघना बोर्डीकर यांच्याशी बोलणे झाले आहे, त्यांचे भाषण अपूर्ण स्वरूपात माध्यमांमध्ये दाखवले जात आहे. असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 
Edited By - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती