राज्यात 7 जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर, बळीराजा चिंतेत

बुधवार, 26 मार्च 2025 (11:50 IST)
सध्या सर्वत्र उन्हाळा सुरु आहे. राज्यातील 7 जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा कहर झाला आहे. अवकाळी पावसामुळे बळीराजाचे मोठं नुकसान झालं आहे. 
ALSO READ: दुधात भेसळ करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई होणार! म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार
राज्यातील कोकण, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस कोसळला आहे. या मुळे नागरिकांचा गोंधळ उडाला आहे. सोलापूर, नांदेड, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. 
ALSO READ: गोरेवाडा प्राणी संग्रहालयात ३ वाघ आणि बिबट्याचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू
सांगली जिल्ह्यात पावसाचा तडाखा मिळाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे बार्शी तालुक्यातील राळेरास मध्ये टरबुजाच्या बागेत नुकसान झाले आहे. सोलापुरात बार्शी येथे द्राक्षाच्या बागेचे मोठे नुकसान झाले आहे. 
ALSO READ: 'पानिपतची तिसरी लढाई मराठ्यांचा पराभव नाही, तर त्यांच्या शौर्याचे प्रतीक आहे', फडणवीस विधानसभेत म्हणाले
राज्यात हवामान खात्यानं पावसाचा यलो अलर्ट दिला होता. अवकाळी पाऊसाने शेतीला चांगलाच फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बळीराजा चिंतेत आहे. पावसामुळे पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. 
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती