सरकार टिकणार हे सांगणं म्हणजे दुबळेपणा लपवण्याचा प्रयत्न - आशिष शेलार

रविवार, 19 सप्टेंबर 2021 (10:19 IST)
"तुमचं सरकार पाच वर्षे टिकणार असेल तर तुम्हाला बोलावं का लागत आहे? सरकार टिकणार हे सांगणे म्हणजे आपल्या अंतर्गत असलेला दुबळेपणा लपवण्याचा प्रयत्न आहे," अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.
 
आपले पाप झाकण्यासाठी देखणेपणाने का होईना बोलावं लागतं. संजय राऊत तेच करत आहेत. मोदी यांच्या नावावर मतं मिळवायची आणि जिंकून आल्यावर दुसरीकडे जायचं. शिवसेना दुबळी आहे. त्यामुळेच ते आता पळ काढण्याचा प्रयत्न करत आहेत,असं शेलार यांनी म्हटलं. 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती