स्वाभिमानीने फुंकले लोकसभेचे रणशिंग; हातकणंगलेसह 5 ते 6 जागा स्वबळावर लढवणार

गुरूवार, 23 मार्च 2023 (08:56 IST)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी  गुढीपाडव्याचा मुहुर्त साधून लोकसभेसाठी रणशिंग फुंकले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यात लोकसभेच्या हातकणंगलेसह 5 ते 6 जागा स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली. ते आज आपल्या पक्षाच्या अभ्यास शिबिराच्य़ा सांगता समारंभात बोलत होते.
 
आपल्या कार्यकारणीला संबोधित करताना ते म्हणाले, “यापुर्वी आम्ही महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलो होतो. त्यानंतर भाजपमधून बाजूला झालो. स्वाभिमानीचा शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, महिला वर्ग, बेरोजगारी, आणि समाजातील विविध घटकांसाठी सातत्याने संघर्ष सुरु असून रस्त्यावरची लढाई संपलेली नाही. केंद्र आणि राज्य सरकारचा कारभार लोकशाहीच्या विरोधात असून लोकांची मुंडकी पिरगाळून तुम्हाला राज्य करता येणार नाही” असा समज त्यांनी सरकारला दिला.
 
पुढे बोलताना ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणारे लोकप्रतिनिधी सभागृहात निवडून जाणे महत्वाचे आहे. मी मांडलेला हमीभावाचा कायदा अजूनही प्रलंबित आहे.  
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती