शिवसेना-यूबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुणे पूल अपघातावर फडणवीस सरकारवर निशाणा साधला

सोमवार, 16 जून 2025 (12:06 IST)
पुण्यातील कुंडमळ्यातील इंद्रायणी पूल अपघातांवर मृतांना श्रद्धांजली वाहून पुणे पूल अपघातांवर शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून सरकारचा निष्काळजीपणा असल्याचे म्हणत फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहे. ते म्हणाले की आता या घोर निष्काळजीपणाचे उत्तर ते कसे देतील?
ALSO READ: पैशाच्या आमिषासाठी इतर कोणत्याही पक्षात जाऊ नका शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले आवाहन
सरकार विकासाबद्दल बोलते पण एक मजबूत पूल देखील बांधू शकले नाही. जुने पूल कोसळून झालेला अपघात अत्यंत दुःखद आणि निषेधार्ह आहे. या अपघाताची जबाबदारी सरकार कधी घेणार असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. 
ALSO READ: पुणे पूल अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकार कडून 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर
या दुर्घटनेमुळे राज्यातील पायाभूत सुविधांच्या कमकुवत स्थितीवर आणि पर्यटन स्थळांवरील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ठाकरे यांनी सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना न्याय आणि भरपाईची मागणी केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
 
दरम्यान त्यांनी मालवणातील राजकोटच्या किल्ल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याच्या चौथऱ्याची जमीन खचली हा मुद्दा उपस्थित केला असून पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी बसवलेला पुतळ्याची पडझड झाली असून आता नवीन पुतळ्याचा प्लॅटफॉर्मची जमीन खचली आहे. 
ALSO READ: पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला 4 जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचवण्यात यश
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबतच असा हलगर्जीपणा का ? यावरून शिवरायांच्या स्मृतींकडे घोर दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. आता सरकार कोणत्या तोंडाने स्पष्टीकरण देणार?"  हा आदर नाही तर अपमान आहे आणि यासाठी जबाबदारी निश्चित केली पाहिजे.असे ते म्हणाले. 
Edited By - Priya Dixit

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती