अन् बाकीचे मंत्री फक्त बारशासाठीच, अमोल मिटकरींची जहरी टिका

गुरूवार, 13 ऑक्टोबर 2022 (15:06 IST)
आताचे सरकार हे देवेंद्र फडणवीस चालवतात. राज्यातील सर्व निर्णय तेच घेतात आणि बाकीचे मंत्री वाढदिवस आणि बारसे साजरे करण्यासाठी राज्याच्या दौऱयावर असतात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील देवेंद्र फडणवीसांचे ऐकतात. बाळासाहेबांची शिवसेना हे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव नाही. आरएसएसचे बाळासाहेब देवरस यांचे नाव आहे असे प्रतिपादन अमोल मिटकरी यांनी केले. तसेच यापुढे क्रिमिनल आणि लबाड लोकांना निवडून देऊ नका. शेतकऱयांच्या प्रश्नासाठी झगडणाऱया लोकांना विधानसभेत पाठवा, असे प्रतिपादन अमोल मिटकरी यांनी केले.
 
गोंदवले बुः (ता. माण) येथील आयोजित राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपस्थित माजी कोकण कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने,राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप, बांधकाम सभापती महेशराव जाधव, मनोज पोळ, श्रीराम पाटील, आ. दीपक चव्हाण, सुनील पोळ, बाळासाहेब सावंत, सौ. मंदाकिनी सावंत, सुभाष नरळे, जयप्रकाश कट्टे, सुरेंद्र मोरे, दिलीप तुपे इत्यादी उपस्थित होते.
 
 आ. अमोल मिटकरी म्हणाले की, आम्ही मंत्रालयात गेल्यानंतर आम्हाला फक्त फडणवीस दिसतात. कारण तेच सर्व निर्णय घेतात. बाकीचे मंत्री दौऱयावर असतात. अशी भयानक परिस्थिती आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती