केवळ राज्य सरकारच्या वेळ काढूपणामुळे मोठा फटका समाजाला बसला

शुक्रवार, 18 जून 2021 (21:07 IST)
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीका करत,“राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आलं ” असं म्हटलं आहे.“केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याने समाजात अतिशय संतप्त भावना आहेत. न्यायालयात प्रकरण सुरू असताना केवळ राज्य सरकारच्या वेळ काढूपणामुळे मोठा फटका समाजाला बसला आहे. ” अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर केली आहे.
 
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावर  भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक झाली. यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी २६ जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे व चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारपरिषदेत घेत याबाबत घोषणा केली.तर, “ओबीसींना हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे आणि त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही. हे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला बाध्य करू आणि गरज पडली तर न्यायालयात जाऊ, अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आली.” असल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती