आम्हाला कांद्याने हरवले, अजित पवारांचा कबुलनामा; केंद्र सरकारला दिला दोष

शनिवार, 15 जून 2024 (12:29 IST)
अजित पवार यांनी स्वीकार केले की, यावेळेस महायुती वर शेतकऱ्यांची नाराजी भारी पडली. खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजीमुळे एनडीएला यावेळेस नुकसान झेलावे लागले. 
 
लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांची एनसीपीच्या खराब प्रदर्शनानंतर महायुतीच्या सरकार मध्ये खटपट सुरु आहे. यादरम्यान अजित पवारांनी स्वीकार केले की, त्यांच्या पार्टीच्या खराब प्रदर्शनामागे  मोठे कारण आहे कांदा. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, महायुतीची सरकार शेतकऱ्यांना संतुष्ट करण्यासाठी कोणताही मार्ग काढू शकली नाही. यामुळे एनडीए युतीला पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर या चार जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झेलावे लागले. 
 
तसेच पवार म्हणाले की, निवडणुकीपूर्व केंद्र सरकारला माहिती देण्यात आली होती की, कांदा मुद्द्यावर समाधान काढणे गरजेचे आहे. कांद्याच्या निर्यातीवरील प्रतिबंधामुळे भाव कमी झाले होते. यामुळे शेतकरी नाराज होता. ते म्हणाले की आम्ही केंद्र सरकारला असे उपाय सांगितले होते की, ज्यामुळे कांदा उत्पादक आणि उपभोक्ता दोन्ही खुश राहतील. यावर लक्ष दिलेनसल्यामुळे जळगाव आणि रावेर सोडून नाशिक, पुणे, अहमदनगर, सोलापूर सीटवर महायुतीला नुकसान झेलावे लागले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती