मुंबई दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? रायगड समुद्रकिनारी सापडली सशस्त्र बोट, हाय अलर्ट

गुरूवार, 18 ऑगस्ट 2022 (16:02 IST)
महाराष्ट्रातील रायगडमध्ये एका मोठ्या कटाचा पर्दाफाश झाला आहे.पोलिसांना या परिसरातून दोन संशयास्पद बोटी सापडल्या आहेत.एका बोटीतून एके-47, रायफल, जिवंत काडतुसे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर रायगड परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.जन्माष्टमीच्या एक दिवस अगोदर आणि गणेश चतुर्थीच्या काही दिवस आधी रायगडमध्ये संशयास्पद बोट सापडणे आणि बोटीतून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केल्याने मोठे प्रश्न निर्माण होत आहेत.काही जण दुसऱ्या बोटीतून रायगडावर दाखल झाले आहेत, याचाही तपास सुरू आहे.याप्रकरणी एटीएसने तपास सुरू केला आहे.त्याचवेळी एनआयएचे पथकही रायगडला रवाना झाले आहे.
 
 रायगड, महाराष्ट्राचे एसपी अशोक यांनी माहिती दिली की, पोलिसांना हरिहरेश्वर समुद्रकिनारी एक संशयास्पद बोट सापडली आहे.बोटीची झडती घेतली असता, त्यातून एक रायफल, जिवंत काडतुसे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.यामागे मोठा दहशतवादी कारस्थान असण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे. 
 
मात्र ही बोट कुठून आली आणि रायगडावर बोट कोणी आणली हे अद्याप समजू शकलेले नाही.मुंबई पोलिसांनी या सर्व प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.दुसरीकडे 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी असून लाखोंच्या संख्येने लोक गणेश विसर्जनासाठी रायगडच्या या भागात पोहोचतात, असे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.अशा स्थितीत सर्व बाबी पाहता पोलिसांनी रायगड परिसरात हाय अलर्ट जारी केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती