गणेशोत्सवानंतर, भाविक नवरात्रोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अर्धपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सप्तशृंगीगडावर नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी हा उत्सव सोमवार, २२ सप्टेंबर रोजी सुरू होत आहे. या काळात राज्यभरातून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात.
भाविकांच्या प्रवासाची सोय करण्यासाठी, नाशिक विभाग दरवर्षी विशेष वाहतुकीची व्यवस्था करतो. सध्या नाशिक ते सप्तशृंग गड दरम्यान दररोज ३० इलेक्ट्रिक बस धावतात. नवरात्रोत्सवादरम्यानही सकाळी ५ ते संध्याकाळी ७:३० वाजेपर्यंत या बस उपलब्ध असतील. प्रभारी विभाग नियंत्रक यांनी सांगितले की, यावर्षी ३२० अतिरिक्त बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे, त्यापैकी १४० नांदुरी ते सप्तशृंग गड दरम्यान धावतील.