दरम्यान, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे घाट, सातारा घाट, संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथेही पिवळा इशारा जारी करण्यात आला आहे. नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाने सखल भागात राहणाऱ्या नागरिक, शेतकरी आणि मच्छीमारांना विशेषतः सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या काही दिवसांत अनेक राज्यांमध्ये पाऊस पडला आहे. आयएमडीच्या इशाऱ्यानुसार, आसाम, मेघालय, मध्य प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, झारखंड, गोवा, महाराष्ट्र, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम यासह 26 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील पुणे, रायगड, सातारा, नाशिक, मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसासोबत जोरदार वारे, धुळीची वादळे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.