पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बिंगुंडा येथे ५० ते ६० नक्षलवादी जमले असून ते पोलिसांवर हल्ला करण्याचा विचार करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. यावर, १८ मे रोजी, केंद्रीय राखीव दलाच्या सी-६० आणि ३७ व्या बटालियनच्या ६ तुकड्या बिंगुंडा भागात पाठवण्यात आल्या. तसेच १९ मे रोजी नक्षलविरोधी कारवाईदरम्यान, पोलिस दलाने नक्षलवाद्यांना पाहिले, परंतु पोलिस दलाला पाहताच ते जंगलात पळून गेले.पण पोलिसांनी पाच नक्षलवादी महिलांना अटक केली. आता या पाच नक्षलवादी महिलांची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.