शेतकऱ्यांनी पेटवले महावितरणचे कार्यालय

गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (11:48 IST)
कोल्हापूर- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये महावितरण कार्यालयासमोर मागील दोन दिवसांपासून आंदोलन सुरु असताना याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या भावनेतून अज्ञात शेतकऱ्यांनी महावितरणाच्या कार्यालयाला आग लावल्याची घटना घडलीय. मध्यरात्री अज्ञात शेतक-यांनी कागल येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय पेटवले.
 

शेतकऱ्यांना दिवसा वीज व महावितरणच्या भ्रष्ट कारभाराविरोधात स्वाभिमानीचे आंदोलन पेटले.#कोल्हापूर येथील #महावितरण कार्यालयासमोर मा.खा.@rajushetti यांच्या धरणे आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने संतप्त अज्ञात शेतक-यांनी कागल महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय पेटविले. pic.twitter.com/ARLO5pNRhc

— स्वाभिमानी शेतकरी संघटना अधिकृत (@swabhimani7227) February 24, 2022
आग लागल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रशासनाने छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या अग्निशामक यंत्रणेची मदत घेत आग आटोक्यात आणण्यात आली. “शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाची तीव्रता वाढणार असल्याचा संघटनेकडून इशारा,” अशं ट्विटही संघटनेच्या ट्विटर हॅण्डलवरुन हा आग लावल्याचा व्हिडीओ पोस्ट करत देण्यात आलाय.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती