अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ऐतिहासिक राज्य मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत फडणवीस सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
कुपोषण, बालमृत्यू दर, मातामृत्यू दर कमी करणे, लिंगभेद दूर करणे आणि मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढवणे, बालविवाहमुक्त समाज निर्माण करणे, लैंगिक आणि शारीरिक शोषण रोखणे आणि हिंसाचारमुक्त कुटुंब आणि समाज निर्माण करणे, वाईट प्रथा दूर करणे, महिलांना सरकारी योजनांचे लाभ देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या विकसित करण्यासाठी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.