तसेच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधताना म्हटले की, जनता महाराष्ट्रात विकास कामे करणाऱ्यांना मत देते, टीका करणाऱ्यांना नाही. मी गेल्या अडीच वर्षांपासून मुख्यमंत्री असताना रात्रंदिवस माझ्यावर टीका होत होती. पण जनतेने टीका करणाऱ्यांना घरी पाठवले. ते पुढे म्हणाले, धारावीच्या लोकांना वर्षानुवर्षे झोपडपट्टीत ठेवणारे लोक नेहमीच आलिशान बंगल्यात राहत होते.त्यांना आता धारावीच्या पुनर्विकासामुळे पोटदुखी होत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, काँग्रेसच्या काळात घोटाळ्यांमुळे अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती. अशा कठीण काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला नवीन जीवन देण्याचे काम केले.