अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा 4 मार्च रोजी दिला. त्यांच्यावर बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणि कृषी खात्यातील कथित घोटाळ्याच्या आरोपांमुळे चर्चित असलेले धनंजय मुंडे यांनी सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी यांच्यासह सागर बंगल्यावर जाऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपला राजीनामा दिला. फडणवीसांनी त्यांचा राजीनामा स्वीकार केल्याचे पत्रकारांना सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडे यांना कार्यमुक्त केल्याची अधिकृत घोषणा केली.