देवेंद्र फडणवीस मराठ्यांचा द्वेष करतात, मनोज जरांगेचा उपमुख्यमंत्र्यांवर आरोप

मंगळवार, 3 सप्टेंबर 2024 (18:09 IST)
मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्त्ये मनोज जरांगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत त्यांना मराठांचा द्वेषी म्हटले आहे. राज्यात फडणवीस यांच्या संमतीशिवाय काहीही होत नाही. त्यांना जे योग्य वाटते ते तेच करतात. राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर महायुतीची सत्ता राहणार नाही. असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. 

राज्य सरकार लाडकी बहीण योजना आणत आहे मात्र मराठांना आरक्षण देत नाही. ते शेतीमालाला रास्त भाव देखील देत नाही. आता दिवाळीच्या वेळेस राज्यात आनंदाचा शिधा म्हणून योजना आणली जाईल आणि निकृष्ट साहित्याचे वाटप केले जाईल. फडणवीस कसले सरकार चालवत आहे हे जनतेला आता समजले आहे. राज्य सरकारने जर मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर त्यांची सत्ता होऊ देणार नाही. त्यांना एकही जागा जिंकता येणार नाही. 

सखेसोयरे अध्यादेशाची सद्यस्थिती काय आहे, फडणवीस कोणाला काम करू देत नाही. मग तो सगेसोयरेंचा प्रश्न असो किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न असो. फडणवीस मराठ्यांचा द्वेष करतात. या साठी ते सगेसोयरे अध्यादेश लागू होऊ देत नाही. असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. 
Edited by - Priya Dixit  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती