कोल्हापुर मध्ये अतिक्रमण काढण्यावरून गोंधळ, पोलिसांवर दगडफेक, 21 जण ताब्यात

मंगळवार, 16 जुलै 2024 (10:26 IST)
कोल्हापुरच्या विशालगढ किल्ल्याजवळ अतिक्रमण काढण्यात आले त्यावेळी एकच गोंधळ झाला. दुकानांची तोडफोड आणि आग लावण्याचा प्रयत्न केला गेला. पोलिसांनी 21 लोकांना ताब्यात घेतले आहे. 
 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा महाराष्ट्रातील कोल्हापूर मधील विशालगढ जवळील अतिक्रमण काढण्यासाठी लोकांचे आंदोलनाने रविवारी हिंसक वळण घेतले. अतिक्रमण विरुद्ध हिंदू संगठना आणि शिव भक्तांचे लोक मोठ्या संख्येत एकत्र झाले. तर दुसऱ्या पक्षातील लोकांची संख्या वाढल्याने हिंसक वळण लागले.
 
दुकानांची तोडफोड आणि आग लावण्याचा प्रयत्न केला गेला. सध्या या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे व सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे. पोलिसांनी 500 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोबतच 21 लोकांना अटक केली आहे. कोल्हापूरचे जिल्हाअधिकारी म्हणाले की, रविवारी हिंसा तेव्हा वाढली जेव्हा, मराठा शाही आणि पूर्व खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्व मध्ये काही दक्षिणपंथी कार्यकर्त्यांना निषेधाज्ञाच्या लक्षात ठेवत किल्ल्याच्या बाहेर थांबवण्यात आले. 
 
यांनतर दक्षिणपंथी संघठना विरोधानंतर उपद्रवीननी दगड फेक केली आणि सार्वजनिक संपत्तिला नुकसान पोहचवले.अधिकारींनी सांगितले की, नेत्या सोबत 500 पेक्षा जास्त लोकांविरोधात चार प्रकरण नोंदवण्यात आले आहे. तसेच 21 लोकांना अटक करण्यात आली आहे. तसेच जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कडक सुरक्षा मध्ये सोमवारी अतिक्रमण विरोधी अभियान सुरु झाले.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती