महाराष्ट्रातील अतिवृष्टीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली आढावा बैठक, प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश

सोमवार, 26 मे 2025 (21:50 IST)
महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई आणि एमएमआर भागात मुसळधार पाऊस पडला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले.
 
मिळालेल्या माहितनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सतत आढावा घेत आहे. या परिस्थितीत, त्यांनी नागरिकांना तात्काळ मदत पुरवण्यासाठी संपूर्ण प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहे. ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे त्या ठिकाणी तातडीने पंचनामा तयार करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहे. मुख्यमंत्री राज्याचे मुख्य सचिव आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी सतत संपर्कात आहे.
ALSO READ: विमानसेवा आणि रेल्वे सेवा बंद, मेट्रो स्टेशन पाण्याने भरले, मुंबई आणि रायगडसह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट
तसेच राज्यातील पावसाच्या परिस्थितीची माहिती विविध यंत्रणांकडून मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. राज्यातील पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई आणि एमएमआर भागात मुसळधार पाऊस पडला आहे.  
ALSO READ: छत्रपती संभाजीनगर: दरोड्यात काही पोलिसांचा सहभाग होता, संजय शिरसाट यांच्या दाव्याने खळबळ उडाली
तसेच रायगडमध्ये वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर महाड ते रायगड किल्ल्याकडे जाणारा रस्ता मुसळधार पावसामुळे बंद करण्यात आला आहे.
 
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव, महाराष्ट्रात ४३ नवीन रुग्ण आढळले

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती