हिंदी वाद हा मुख्य मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्याचा एक मार्ग, काँग्रेस नेत्याचा मोठा आरोप

शनिवार, 28 जून 2025 (16:45 IST)
महाराष्ट्रात हिंदी भाषेच्या वादाचा मुद्दा तापला आहे. आता या आंदोलनावर काँग्रेस नेत्याचेही विधान समोर आले आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी याला मुख्य मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्याचा एक मार्ग असल्याचे म्हटले आहे.
ALSO READ: महाराष्ट्रातील हिंदी वादात सचिन तेंडुलकरला ओढू नका, शरद पवारांचा राज ठाकरेंना सल्ला
मिळालेल्या माहितनुसार महाराष्ट्रात हिंदी भाषेविरुद्ध बंड वाढत आहे. या वाढत्या तणावादरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आरोप केला आहे की, महाराष्ट्रात हिंदी भाषा 'लादण्या'वरून वाद निर्माण केला जात आहे जेणेकरून लोकांचे लक्ष मुख्य मुद्द्यांपासून दूर करता येईल. भाषेच्या वादापेक्षा शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी शिक्षणासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत मोठी कपात केल्याचा दावा केला आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यावर आणि शैक्षणिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे सांगितले. 
ALSO READ: कर्नाटक: वाघिणीला आणि तिच्या चार बछड्यांची विष देऊन हत्या, तीन आरोपींना अटक
तसेच चव्हाण यांनी शुक्रवारी कोल्हापूर येथे पत्रकारांना सांगितले की, "शिक्षणावरील अर्थसंकल्पीय वाटप वाढवावे. इंग्रजी आणि हिंदी लादण्यावरील वाद अप्रासंगिक आहे आणि ते मुख्य मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी केले जात आहे." माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की महाराष्ट्रातील आयआयटी मध्ये शिक्षक पदे रिक्त आहे. "तसेच, कृषी विद्यापीठांमध्ये पदे भरण्यात आलेली नाहीत," असे ते म्हणाले.
ALSO READ: जमिनीच्या मंजूर मर्यादेपेक्षा जास्त बांधण्यात आलेल्या बेकायदेशीर हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सवर ईडीची मोठी कारवाई
Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती