Terror attack in Pahalgam : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह महाराष्ट्रात आणले जात आहे. तसेच, पर्यटकांना परत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी विशेष चर्चा केली.
मिळालेल्या माहितीनुसार जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ जणांना आपला जीव गमवावा लागला. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर, जम्मू-काश्मीरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आणि त्यांना राज्यात सुरक्षितपणे परत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. या संदर्भात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अजित पवार यांनी ओमर अब्दुल्ला यांना महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीने मदत करण्याची विनंती केली. प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणणे आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा देणे हे आमचे प्राधान्य आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.