मिळालेल्या माहितनुसार पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह महाराष्ट्रातील त्यांच्या घरी परत आणण्याची तयारी सरकारने केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला. यापैकी ३ डोंबिवलीचे, २ पुण्याचे आणि एक पनवेलचा होता. या सर्व लोकांचे मृतदेह परत आणण्यासाठी राज्य सरकारने विशेष व्यवस्था केली आहे. यासाठी मंत्री गिरीश महाजन स्वतः श्रीनगरला रवाना झाले.
दोन मृतांचे मृतदेह मुंबईत पोहोचले
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींचे मृतदेह एअर इंडिया कार्गोने श्रीनगरहून मुंबईला परत आणण्यात आले. मुंबई देशांतर्गत विमानतळावर मंत्री आशिष शेलार, गुलाबराव रघुनाथ पाटील, मंगल प्रभात लोढा आणि योगेश कदम उपस्थित होते. कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव पुण्यात पोहोचणार आहे. पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. संजय लेले आणि दिलीप देसले यांचे मृतदेह एअर इंडियाच्या विमानाने श्रीनगरहून मुंबईत आणण्यात आले. दुपारी १२.१५ वाजता विमान निघाले. पुण्यातील रहिवासी कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचे मृतदेह सायंकाळी ६ वाजता निघणाऱ्या विमानाने पुण्यात आणले जातील.