ऊस लागवडीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचा एक अनोखा उपक्रम महाराष्ट्रात सुरू होणार आहे. ऊस लागवडीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्याने पाण्याची गरज 50 टक्क्यांनी कमी होईल, असे सांगण्यात आले आहे. तसेच, प्रति एकर उत्पादनात सुमारे 30 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रातील एका तज्ज्ञाने बुधवारी ही माहिती दिली.
महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ लिमिटेडचे संचालक जयप्रकाश दांडेगावकर यांनी पीटीआयला सांगितले की, मायक्रोसॉफ्टने ऊस लागवडीसाठी एआयच्या वापरावर बराच काळ काम केले आहे आणि उसाचे उत्पादन 30 टक्क्यांनी वाढवण्याचे आणि लागवडीतील पाण्याचा वापर निम्म्याने कमी करण्याचे आश्वासन दिले आहे.
ऊस लागवडीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी महाराष्ट्रातील 40 साखर कारखान्यांचा समावेश केला जाईल, ज्यामध्ये 23 सहकारी आणि 17 खाजगी साखर कारखान्यांचा समावेश आहे,