पोलिसांना तपासात आढळून आले की, गणेश रस्त्याने चालत असताना सात मद्यधुंद अल्पवयीन मुलांनी त्यांचे अपहरण केले आणि त्यांना काठ्यांनी आणि ठोस्यांनी मारहाण केली. नंतर गळा आवळून चाकूने हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या केली. त्यांचा जवळील मोबाईल आणि पैसे घेऊन पसार झाले आणि मृतदेह उसाच्या शेतात फेकून दिले. पोलिसांनी या प्रकरणी सातही मुलांना अटक केली आहे.
मृताचा मोबाइल सात जणांच्या टोळीतील एका मुलाने विकत घेऊन चालू केला होता. त्यामुळे पोलिसांनी मोबाइलच्या ट्रॅकिंगमुळे अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आणि त्यानंतर खुनाला वाचा फुटली. वाढदिवसाच्या पार्टीसाठी सातही मुलांना तरुणाची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आता सात अल्पवयीन आरोपींवर शिर्डी पोलीस ठाण्यात अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.