वडिलांनी रागावल्यामुळे 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची विहिरीत उडी घेत आत्महत्या

शुक्रवार, 20 जून 2025 (11:03 IST)
वडिलांनी मुलीला घरी उशिरा येण्याचे कारण विचारत रागावल्यामुळे 16 वर्षाच्या मुलीने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगावच्या केडी हडको परिसरात घडली आहे.  प्रज्ञा रवींद्र शिंदे असे या मयत मुलीचे नाव आहे. 
ALSO READ: एकनाथ शिंदे यांचा शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल
प्रज्ञा बुधवारी 18 जून रोजी घरातून बाहेर कोणालाही न सांगता पडली.आणि रात्री 8 वाजे पर्यंत आली. तिच्या वडिलांनी तिला उशीर का झाला आणि कुठे गेली होती विचारण्या केल्यावर तिला राग आला आणि ती कोणालाही काही न बोलता घराबाहेर पडली आणि दुसऱ्या दिवशी गुरुवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास तिचा मृतदेह जवळच्या विहिरीत तरंगताना आढळला.  स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली . शनी पेठ पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह बाहेर काढण्यात आला.
ALSO READ: गोंदिया : काळ्या जादूचा संशय बनले मृत्यूचे कारण; शेतकऱ्याची कुऱ्हाडीने हत्या
प्रज्ञा एका साध्या मजुर कुटुंबातील होती. तिचे वडील रवींद्र शिंदे कष्टाचे काम करून कुटुंब चालवतात. पालकांव्यतिरिक्त, कुटुंबात दोन बहिणी आणि दोन भाऊ आहेत. जेव्हा प्रज्ञाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला तेव्हा आईच्या किंकाळ्या संपूर्ण परिसराला ऐकू आल्या. वडील वारंवार स्वतःला शिव्या देत राहिले - "काश मी तिला मिठी मारली असती, काश मी थोडे प्रेम दाखवले असते..."तर तिने असे टोकाचे पाऊल उचलले नसते. 
ALSO READ: मनसे कार्यकर्त्यांनी हिंदी पुस्तके जाळली, राज ठाकरे यांनी पुन्हा सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले
पोलिसांनी या घटनेची नोंद अनैसर्गिक मृत्यू म्हणून केली आहे. शवविच्छेदनानंतरच खरे कारण स्पष्ट होईल, परंतु प्राथमिक तपासानुसार, आत्महत्येचे कारण घरगुती तणाव असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती