शिवसेनेचा नरेंद्र मोदींना टोला

शनिवार, 28 मे 2016 (12:17 IST)
नेहरू, इंदिराजी, राजीव गांधी, नरसिंह रावांच्या नावाच्या फक्त पाट्या पुसून नवे घडणार नाही. आपला इतिहास आपणच घडवायला हवा' असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उदधव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना लगावला आहे. '
 'आधीच्या सरकारने काहीच केले नाही हा मंत्र नसून तुणतुणे असते. आधीच्या सरकारांनी काहीच केले नसते तर आजचा देश दिसलाच नसता' असेही त्यांनी म्हटले असून ' कर्ज काढून सण साजरा करण्याची परंपरा येथे आहेच. हे कर्ज कमी झाले तरी देश पुढे जाईल' असा सल्लाही उद्धव यांनी दिला आहे.

वेबदुनिया वर वाचा