गुहागरमधील पराभव हा भाजपमुळेच झाला असून कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रु कधीही बरा, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली असून त्यानंतर युतीमधील दुरावा वाढला आहे. रामदास कदम यांच्या वक्तव्यानंतर याबाबत शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गो-हे यांनीही कदम यांच्या वक्तव्याची री ओढली असून भाजप केवळ स्वार्थाचे राजकारण करत असल्याची टीका केली आहे.
त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजप नेते विनोद तावडे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली असून हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.