पुणे हत्या प्रकरण : बहिणीशी वाद झाल्यावर भाऊ -वहिनी ने केला निर्घृण खून, आरोपींना अटक

रविवार, 1 सप्टेंबर 2024 (16:22 IST)
पुण्याच्या खराडी परिसरात मुठा नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह आढळला होता. या मृतदेहाचे हात पाय नव्हते. या मृतदेहाची ओळख पटली असून भाऊ वाहिनीशी राहत्या घराच्या वाद झाल्यामुळे तिची निर्घृण हत्या करण्यात आली. महिलेचे डोकं कापण्यात आले असून देहाला नदीपात्रात फेकून दिले. पोलिसांनी आरोपी भाऊ -वहिनीला अटक करण्यात आली.   

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 ऑगस्ट रोजी पुण्याच्या खराडी भागात मुठा नदीपात्रात एका महिलेचा हात पाय आणि डोकं कापलेले मृतदेह आढळले.मृतदेह फेकण्यापूर्वी पुरावे नष्ट करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

मिळालेल्या माहितीनुसार, मयत महिलेचा तिच्या भाऊ -वाहिनीशी झोपडीत एका खोलीसाठी वाद झाला नंतर पोलिसांना महिलेच्या गहाण होण्याची सूचना दिली. पोलिसांनी महिलेचा शोध घेण्यास सुरु केले. नंतर एका महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांनी भाऊ आणि वहिनीला अटक केली असून चौकशी केल्यावर महिलेचा गळा आवळून खून केला नंतर तिचे शिरविच्छेद करण्यात आले. नंतर पुरावे नष्ट करण्यासाठी देहाचे तुकडे करून पाण्यात टाकले. 

पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 103 (हत्या) आणि 238 (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत या जोडप्याला अटक केली आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती