शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचे पुत्र आणि महाराष्ट्र सरकारमधील माजी आरोग्य मंत्री ऋतुराज तानाजी सावंत यांचे आज अपहरण करण्यात आले. सोमवारी म्हणजेच आज, 10 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता कारमधून आलेल्या अपहरणकर्त्यांनी तानाजी सावंत यांचा मुलगा ऋतुराज याला पळवून नेल्याचे सांगण्यात येत आहे.या घटनेने खळबळ उडाली आहे.
तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण कुणी आणि कशासाठी केलं याचा तपास पोलिस करत आहे.
तानाजी सावंत यांच्या कात्रज परिसरातील निवासस्थानी पोलिसांचे एक पथक पोहोचले आहे. या ठिकाणी कोणाचे फोन आले होते का किंवा खंडणी मागण्यात आली होती का पोलिस याचा शोध घेत आहे.