Airtel, Vodafone Idea च्या यूझर्सला मोठा दिलासा, कंपन्यांनी वैधता वाढवली

शनिवार, 18 एप्रिल 2020 (11:08 IST)
एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया कंपन्यांनी 3 मे  पर्यंत वैधता वाढवल आहे. अथार्त या महिन्यात ज्या प्लानची वैधता संपणार होती ती आता ३ मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे या युजर्संना मोठा दिलासा मिळाला आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवले आहे. म्हणून यूझर्संला दिलासा देण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांनी 3 मे पर्यंत वाढवली आहे. पहिल्या लॉकडाऊनमध्ये टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या मोबाइल युझर्संना 17 एप्रिल पर्यंत वैधता वाढवली होती. ही वैधता वाढवण्यात आल्याने प्री पेड ग्राहकांची वैधता संपणार होती.  त्यामुळे युझर्संना अडचण नको म्हणून येत्या 3 मे पर्यंत युझर्संची इनकमिंग सुरू राहणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती