Jammu and Kashmir News: मंगळवारी काश्मीरमधील पहलगाम शहराजवळील एका रमणीय कुरणात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. माहिती समोर आली आहे की, यामध्ये २७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार दुपारी ३ वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील दिलीप आणि अतुल यांचा मृत्यू झाला आहे. पहलगाम हल्ल्यातील जखमीं मध्ये विनो भट्ट गुजरात, माणिक पाटील, रिनो पांडे, एस बालचंद्रू महाराष्ट्र, डॉ. परमेश्वर अभिजवन राव कर्नाटक, संत्रू तामिळनाड, साहसी कुमारी ओडिशा यांचा समावेश आहे. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या दहशतवादी हल्ल्याचे वर्णन "अलिकडच्या काळात नागरिकांवर झालेल्या कोणत्याही हल्ल्यापेक्षा खूप मोठे" असे केले आणि मृतांचा आकडा निश्चित केला जात असल्याचे सांगितले.