विषारी पाणी पाजून 58 गायींचे प्राण घेतले, नोकरीवरून काढल्याचा राग, आरोपीला अटक

रविवार, 31 ऑक्टोबर 2021 (10:25 IST)
नोएडातील सूरजपूर भागातील खोडना खुर्द गावात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या 58 गायींना विषबाधा करणाऱ्याच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी पूर्वी पीडितेकडे काम करायचा . त्याला नोकरीवरून काढून टाकले होते .त्याचा आरोपीला राग आला आणि   त्याने गायींना विष देऊन ठार केले. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
 
पोलिस आयुक्त आलोक सिंह यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, खोडना खुर्द गावात राहणाऱ्या ओमवीर नागर यांची डेअरी आहे, तेथे त्यांनी गायी पाळल्या आहे. त्यांनी सांगितले की, ओमवीर नागर यांच्या कडील 58 गायींचा 5 दिवसांत संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. त्यांनी या प्रकरणाची पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी पशुवैद्यकांच्या पथकाला बोलावून तपास केला असता विष प्राशन केल्याने गायींचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
 
प्रवक्त्याने सांगितले की, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी शनिवारी ओमवीर नागरचा जुना गडी धर्मेंद्र याला अटक केली. चौकशीदरम्यान पोलिसांना समजले की धर्मेंद्रला ड्रग्जचे व्यसन होते, त्यामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. त्यामुळे संतप्त होऊन त्यांनी गाईंच्या पिण्याच्या टाकीत विष मिसळले, त्यामुळे ते विषयुक्त पाणी प्यायल्याने गाईंचा मृत्यू झाला
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती