Keral : मेंदूत जंत शिरल्यामुळे 15 वर्षाच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू

शनिवार, 8 जुलै 2023 (19:30 IST)
जगात असे अनेक आजार आहेत, ज्याबद्दल ऐकून मन सुन्न होऊन जाते. अशीच एक घटना केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यात घडली. येथे एका मुलाचा मेंदूमध्ये प्रवेश करून  किड्यानेमेंदू खाल्ल्याने  मुलाचा मृत्यू झाला.केरळमधील अलप्पुझा शहरात एक 15 वर्षांचा मुलगा धबधब्यावर आंघोळीसाठी गेला होता. धबधब्यात आंघोळ केल्यावर त्यांची प्रकृती खालावली. प्रथम त्याला मानदुखी, नंतर ताप, नंतर झटके आले. कुटुंबीयांनी त्याला डॉक्टरांकडे नेले असता, त्याला अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीसचा प्राथमिक संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू झाले, मात्र त्याला वाचवता आले नाही.
 
हा जंत शरीरात कसा पोहोचतो?
हा जंत माणसाच्या आत कसा शिरतो हा सर्वात मोठा प्रश्न आहे. याला उत्तर देताना केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, हा अळी अमिबाचा एक प्रकार आहे जो साचलेल्या दूषित पाण्यात आढळतो. त्यांनी राज्यातील जनतेला घाणेरड्या पाण्यात अंघोळ करणे टाळावे, असे आवाहन केले आहे. कारण अंघोळ करताना हा जंत आधी नाकात जातो आणि नंतर मेंदूपर्यंत पोहोचतो. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा जंत   खूपच लहान आहे आणि तो तुमच्या नाकात कधी शिरतो हे तुम्हाला कळतही नाही. हेच कारण आहे की सुरुवातीला रुग्णाला कळत नाही की त्याच्यासोबत असे का होत आहे.
 
या कीटकाचे नाव काय आहे?
सामान्य भाषेत या जंताला मेंदू खाणारा अमिबा म्हणतात. मात्र, विज्ञानाच्या भाषेत याला Naegleria fowleri म्हणतात. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या म्हणण्यानुसार, हा अमिबा केवळ दूषित पाण्यातच नाही तर माती, उबदार आणि गोड्या पाण्यात आणि अगदी गरम पाण्याच्या झऱ्यांमध्येही राहतो. या कीटकाबद्दल सांगायचे तर, हा जंत  पहिल्यांदा 1965 साली ऑस्ट्रेलियात सापडला होता.
 
या आजाराची लक्षणे काय आहेत?
या आजाराच्या लक्षणांबद्दल सांगायचे तर, हा जंत तुमच्या मेंदूमध्ये प्रवेश करून संक्रमित होताच डोकेदुखी, उलट्या, ताप यासारख्या गोष्टी होऊ लागतात. जंत शरीरात गेल्यानंतर एक ते 12 दिवसांत या आजाराची लक्षणे दिसू लागतात
 
Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती