महंत भास्कर दास यांचे निधन, दावा केला होता रामजन्मभूमीवर

शनिवार, 16 सप्टेंबर 2017 (16:30 IST)

निर्मोही आखाड्याचे संत आणि रामजन्मभूमी वादातील सर्वात जुने पक्षकार महंत भास्कर दास  (८८)यांचे शनिवारी निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. शनिवारी त्यांची प्रकृती आणखी खालावली. गेल्या चार दिवसांपासून महंत भास्कर दास यांच्यावर फैजाबाद हर्षण हार्ट संस्थेमध्ये उपचार सुरू होते.

महंत भास्कर दास यांनी १९५९ मध्ये अयोध्येतील रामजन्मभूमीवर दावा सांगणारी याचिका दाखल केली होती. त्याचमुळे या प्रकरणातले ते सर्वात जुने पक्षकार होते. मुस्लिम पक्षकार हाशिम अन्सारी यांच्यासोबत भास्कर दास यांचे चांगले संबंध होते. रामजन्मभूमी आणि बाबरीचा वाद असूनही या दोघांमधील स्नेह कायम होता. काही दिवसांपूर्वीच हाशिम अन्सारी यांचही निधन झालं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती