अलिगड महामार्गावर एक भीषण रस्ता अपघात, 3 ठार, मुख्यमंत्री योगी ने दुःख व्यक्त केले

शनिवार, 10 ऑक्टोबर 2020 (11:28 IST)
अलिगड शनिवारी उत्तर प्रदेशच्या अलीगड जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली असून तेथे एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. नोएडा आग्रा एक्सप्रेस वेवर इटावाहून दिल्लीकडे जाणारी खासगी बस अनियंत्रित झाली. या अपघातात 3 लोकांचा मृत्यू मृत्यू झाला आहे. तर 5 लोक गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिस स्टेशन घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला व पोस्टमॉर्टमसाठी पाठविला. अपघाताबाबत तपास सुरू आहे.
 
ही घटना अलिगडच्या पोलिस स्टेशन परिसरातील आहे. जेथे कानपुराहून दिल्लीकडे जाणारी खासगी बस पालटी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, रेड बस सेवेची एक बस कानपुराहून दिल्लीकडे प्रवाशांना घेऊन जात होती जी सिमरोठीजवळील बसने डिवाइडरला धडक दिल्यानंतर ती पालटली. ज्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला तर 5 हून अधिक गंभीर जखमी झाले. या घटनेमागील बसचे टायर बस्ट असल्याचे सांगितले जात आहे.
 
माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या सीओ खैर एम खान यांनी सांगितले की या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 5 लोक जखमी झाले. जिल्हा प्रशासनाकडे पूर्ण तयारी दर्शवत जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. यासह एडीएमसह सर्व अधिकारी घटनास्थळी पोहोचले. दुसरीकडे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीगड जिल्ह्यातील टप्पल येथे झालेल्या भीषण अपघातात झालेल्या मृत्यूमुळे लोकांच्या मृत्यूबद्दल दुःख: व्यक्त केले आहे. दिवंगत झालेल्या आत्म्यास शांती मिळाल्याबद्दल मृतांच्या  परिवारात त्यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती