हिवाळ्यानंतर फेब्रुवारी महिना सहसा आल्हाददायक असतो, परंतु यावर्षी मुंबईतील हवामानाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. थंड वाऱ्याची जागा आता तेजस्वी सूर्यप्रकाश आणि दमट उष्णतेने घेतली आहे. तापमान सामान्यपेक्षा 5 अंशांनी जास्त झाले आहे, त्यामुळे मार्च-एप्रिलसारखी उष्णता लोकांना जाणवत आहे.
या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबईत असामान्यपणे तीव्र उष्णता जाणवत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मंगळवार आणि बुधवारी शहर आणि आसपासच्या भागात यलो अलर्ट जारी केला आहे. हवामानशास्त्रज्ञांच्या मते, मुंबईतील तापमान 37-38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते, जे सामान्यपेक्षा 5अंशांनी जास्त आहे. या उष्णतेमुळे पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते, त्यामुळे शहरात पाणीटंचाईची समस्या वाढण्याची शक्यता आहे.
जर उष्णता अशीच चालू राहिली तर पाण्याची पातळी आणखी कमी होऊ शकते. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, उच्च तापमानामुळे पाणी लवकर बाष्पीभवन होते, ज्यामुळे तलावांची पाण्याची पातळी झपाट्याने कमी होते. गेल्या वर्षीही मे महिन्यात अशाच उष्णतेमुळे पाणीपुरवठा खंडित करावा लागला होता. सध्या, बीएमसीने पाणीकपातीबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही, परंतु परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.