भारत आणि पाकिस्तान तणावाच्या दरम्यान, मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. उद्यापासून मुंबईत फटाके फोडण्यावर आणि रॉकेट सोडण्यावर बंदी आहे. सीमेवरील वाढता तणाव आणि भारत-पाकिस्तान तणाव लक्षात घेता मुंबई पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. 11 मे ते 9 जून पर्यंत फटाके फोडण्यास बंदी आहे. आदेशाचे पालन न केल्यास कारवाई केली जाईल.
मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 व्या कलम 10 मधील पोटकलम 2 सह कलम 33 च्या पोटकलम 1 च्या खंडनुसार मुंबई पोलिसांनी शहरात फटाके, रॉकेट उडवण्यावर बंदी घातली आहे. या आदेशाची माहिती पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी, लाऊडस्पीकर, मेगाफोनवरून दिली जाणार आहे.