विमान धावपट्टीवर वेगाने आले. विमान उड्डाण घेण्याच्या तयारीत असताना अचानक पायलटने धावपट्टीवर विमान थांबवले. यामुळे विमानातील प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली.व मुंबईहून जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान ऑपरेशनल समस्येमुळे रद्द करण्यात आले. असे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले. तसेच प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली."