सदर घटना मुंबईतील नागपाडा भागात रविवारी घडली.बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या पाण्याची टाकी साफ करणाऱ्या 5 कर्मचाऱ्यांचा टाकीची सफाई करताना जीव गुदमरल्याने मृत्यू झाला. हे कामगार पाण्याच्या टाकीची सफाई करण्यासाठी टाकीत गेले होते. मात्र बराच वेळ झाल्यावर ते बाहेर आले नाही. आजूबाजूच्या लोकांनी टाकीत डोकावून पाहता त्यांना त्यांचे मृतदेह दिसले.