देशात येणारे सरकार स्थिर असेल अशी भावना शेअर बाजारात पसरल्याने गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. मात्र गुंतवणूक दारांनी या आकड्यांना भुरळून न जाता सावध व्यवहार करण्याचा सल्ला अर्थतज्ञांनी दिला आहे. 2004 सालच्या निवडणुंकामध्येही अशाच प्रकरच्या आर्थिक घडामोडींनंतर गुंतवणुकदारांना मोठा फटका सहन करावा लागला होता. त्यामुळे सावध व्यवहार करण्याचा सल्ला गुंतवणूकदारांना देण्यात आला आहे.