कुतूहलापोटी राजा त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, "तू कोणत्या प्रकारचे रोप लावत आहेस?" म्हातारा हळू आवाजात म्हणाला, "आंबा." राजाने ते वाढण्यास आणि फळ देण्यासाठी किती वेळ लागेल याचा हिशोब केला. गणना केल्यानंतर त्याने त्या म्हाताऱ्याकडे आश्चर्याने पाहिले आणि म्हणाला, "ऐका दादा, हे रोप वाढण्यास आणि फळ देण्यासाठी बरीच वर्षे लागतील, तोपर्यंत तू जिवंत राहशील का?" म्हातारा राजाकडे पाहत होता. राजाच्या डोळ्यात निराशा होती. त्याला वाटले की म्हातारा असे काम करत आहे, ज्याचे फळ त्याला मिळणार नाही.
हे पाहून तो म्हातारा म्हणाला, "तुम्हाला वाटत असेल की मी वेडेपणाचे काम करत आहे. ज्या गोष्टीचा फायदा होत नाही त्यावर कठोर परिश्रम करणे निरुपयोगी आहे, पण विचार करा की या म्हाताऱ्याला इतरांच्या कष्टाचा किती फायदा झाला आहे? त्याने त्याच्या आयुष्यात इतरांनी लावलेल्या झाडांपासून किती फळे खाल्ली आहे? मी ते कर्ज फेडण्यासाठी काही करू नये का? इतर त्यांची फळे खाऊ शकतात या भावनेने मी झाडे लावू नये का? जो फक्त स्वतःच्या फायद्यासाठी काम करतो तो स्वार्थी असतो." म्हाताऱ्याचा हा युक्तिवाद ऐकून राजा खूश झाला, व आज तोही काहीतरी मोठे शिकला होता.
तात्पर्य : कधीही स्वतःचा स्वार्थ पाहू नये; तर नेहमी इतरांचा देखील विचार करावा.